मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असून त्यांची जयंती आपल्या सर्वांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांवर राज्य सरकारची आजवरची वाटचाल सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पुण्यातील संस्थेने पुलवामा येथे उभारला असून, पाकिस्तानकडे तलवार उगारून हा पुतळा बसवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांचे जतन करण्यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले.