नवी दिल्ली – भाजपने समान नागरी संहिता, एक राष्ट्र, एक निवडणूक आणि नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले. भारत तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती असेल याची हमी दिली. त्यात भारत-चीन, भारत-पाकिस्तान आणि भारत-म्यानमार सीमेवर मजबूत पायाभूत सुविधांचा विकास आणि ईशान्येत शांतता निर्माण करण्याचे आश्वासन दिले. पुढील पाच वर्षांसाठी 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन दिले जाईल, असे त्यात म्हटले आहे.