गजानन पाटील चव्हाण यांची रुग्णांना भेट व माहिती
नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड – नायगाव तालुक्यातील मौजेला लालवंडी येथील महाप्रसादातून अंदाजे 150 च्या वर भक्तांना वीस बाधा रुग्ण बादीतावर नायगाव येथे उपचार तर काहींना नांदेड ला हलवले.
शेतामध्ये असलेल्या महादेव मंदिर येथे ठेवलेल्या अंबिली व महाप्रसाद भंडारा कार्यक्रमात प्रसाद सेवन केलेल्या जवळ पास 150 च्या वर भक्त जणाला विषबाधा झाल्याची घटना लालवंडी ता नायगाव येथे दि 15/05/2024 रोजी भंडारा जेवणास आंबील, खीर, हरबऱ्याची भाजी, रोटी, बात, पिण्यास विहिरीचे होतें सेवन केले
तसेच काही वेळेनंतर बुधवारी सायंकाळी रात्रीतून संडास व उलट्या चे प्रमाण वाढल्याने ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे प्राथमिक उपचार करण्यात आले त्यातील काहीची प्रकृती चिंताजनक असल्याने नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले अशी माहिती गजानन पाटील चव्हाण यांनी दिली
लालवंडी या गावांमध्ये बुधवारी सायंकाळी एका शेतकऱ्याच्या शेतातील महादेव मंदिरात समोर भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या भंडार्याच्या जेवनामध्ये भात वरण आंबील खीर या सोबत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरून आणलेली आंबील एकत्र करून वाढण्यात आली.जेवण केलेल्या भक्त गणाना यातून सामूहिक विषबाधा झाली आहे.
********”*************
चौकट
या प्रकरणाची माहिती सकाळी प्राप्त होताच नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण व नायगाव ठाण्याचे पो. नि .मारोती मुंढे यांनी ग्रामीण रुग्णालय नायगाव बा येथे तत्काळ भेट देऊन अधिकची माहिती घेतली व मदतीच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले.ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे पहिल्या टप्यात विषबाधित 18 पेशंट यावर उपचार वैद्यकीय अधिकाऱ्या मार्फत चालू असतानाच रुग्णाचा ओघ चालूच असताना पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली ,
बाधित इसमाची संख्या वाढत आहे. त्यामुळे 06 ॲम्बुलन्स अतिरिक्त बोलावून ठेवल्या व काहींची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती कळताच मदतीसाठी
ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे नायगाव विधानसभेचे युवा नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण व शिवराज लालवंडे, भगवान लगडापुरे, प्रकाश केरुरे, गंगाधर पाटील कल्याण, योगेश पाटील चव्हाण. उपसरपंच ,सरपंच चेअरमन नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे टीमने व वैद्यकीय अधीक्षक
डॉ सोनकांबळे डॉ अडबलवार, डॉ, नाईक डॉ, कदम डॉ जाधव, सिस्टर, कम्प्युटर, सह ग्रामस्थ यांनी रुग्णाची विचारपूस करीत उपचारा संदर्भात माहिती घेतली. व रुग्णाची नातेवाईक ना पण चौकशी केली व मदती साठी सहकार्य केले आहे