नवी दिल्ली – सरकारी कंपन्यांचे कंत्राट देशातील केवळ तीन उद्योगपतींना देऊन मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. कमी दर्जाचा कोळसा तिप्पट किमतीत विकण्यात आला.
कर, विजेची बिले आणि जीएसटी लादून जनतेची लूट केली जात आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास गेल्या दहा वर्षांत झालेल्या कोळसा घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचे समाज माध्यम ‘एक्स’वर व्हिडीओ जारी करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.