तपास डीवायएसपी कंधार कडे..
नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड – लोहा तालुक्यातील मौजे कापसी खुर्द येथील मातंग स्मशानभूमीचा वाद आणि त्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयांनी केलेल्या निकृष्ट दर्जाची कामाची तक्रार मागे घे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन,जीवे मारण्याची धमकी दिली होती.तसेच दि. ०४/०८/२०२३ या रोजी स्मशानभुमीत बेमुदत आमरण उपोषण का केले? असे म्हटल्या नंतर पोलीसात तक्रार दाखल केल्यावर तिघा जणांविरुद्ध उस्मानगर पोलीस ठाण्यात गु. र.नं.८६/२०२४ नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन१९८९,३(१)आर ३3(१) एस भारतीय दंडसंहिता ५०६,३४अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
फिर्यादी नामे एकनाथ गोविंद रेडे हे टेलरिंगचा व्यवसाय करतात.त्यांचे पुतणे नामे गोविंद सटवाजी रेडे,तसेच काही दिवसांपुर्वी मौजे कापसी खुर्द येथील साठे नगर स्मशानभूमीची रितसर नमुना नंबर आठच्या नोंद घेणे.काही जणांनी अतिक्रमण केले आहे.तर जागेवर अनाधिकृतरित्या संबंधित ग्राम पंचायत कार्यालया धरुन तार कंपाऊंड व शेड मारल्यामुळे येथील स्मशानभूमीची जागा भविष्यात अपुरी पडेल म्हणून आम्ही सर्वजण मिळुन स्मशानभूमीतचं लोकशाहीच्या मार्गाने जागा मिळावी म्हणून कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषण केले होते. त्या वेळी वसंत ग्लोबल इंग्लिश शाळेचे अध्यक्ष प्रा.गोविंदराव शंकर मेथे यांनी अनाधिकृत अतिक्रमणे केल्याने संबंधित प्रशासनाने वेळोवेळी लेखी पत्र देऊन सुद्धा काहीच फरक पडला नव्हता.शासनाच्या पत्र व्यवहाराला कंटाळून त्यांचा मनात राग धरुन,अकस बुध्दीने दि. १९/०६/२०२३ रोजी गावातील काही लोकांनी स्मशानभूमीला जागा देतो म्हणून बोलावून घेतले होते. त्या ठिकाणी फिर्यादी एकनाथ रेडे यांच्या सोबत ईतर काही जण उपस्थित होते.
त्याच वेळी गैरअर्जदार गोविंदराव शंकर मेथे,नागोराव रामराव कापसे सरपंच प्रतिनिधी,नामदेव बालाजी मेथे यांनी जाणीव पुर्वक जातीवाचक शिवीगाळ करुन मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा वादानंतर एकनाथ गोविंद रेडे यांच्या तक्रारी वरुन वरील तिघा जणांविरुद्ध उस्माननगर पोलीस स्टेशन मध्ये जातीवाचक शिवीगाळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. तरी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी अश्या गंभीर आरोपीला अद्याप पर्यंत अटक झालेली नसल्यामुळे, अर्जदारास आरोपी कडून वेळोवेळी धमक्या येत आहेत.उस्माननगर पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक आर्थिक दुर्लक्ष केले जात आहे.अश्या गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी कंधार कडे असुन ही आरोपी फरार आहेत.असे टिपीकल उत्तर मिळणे म्हणजे कायदा-सुव्यवस्था व गावात सामाजिक शांतता बिघडण्यासाठी नांदेड पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप फिर्यादी कडून होत आहे. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दलित मागासवर्गीय समाजातील कुटुंबावर अन्याय-अत्याचार तितकेच वाढले आहे. ही चिंतनीय गोष्ट आहे.