माझी वसुंधरा अभियान; राज्यात माहूर दुसरा

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

२२ हजार ६३२ स्थानिक स्वराज्य संस्था:नगरपंचायत, ग्रामपंचायत मधून माहूर शहराचा दुसरा क्रमांक आल्याने माहूर नगरपंचायतचे होत आहे अभिनंदन

नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या सर्वधर्मसमभाव विकास कामाची पावती

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

माहूर : माहूर नगरपंचायत अंतर्गत पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान मध्ये सतत चार वर्षे केलेल्या कठीण परिश्रमाच्या कार्याची पावती राज्य सरकारकडून माहूर नगरपंचायतला अत्यंत मानाचा दुसरा क्रमांक देऊन गौरविण्यात आल्याने माहूरगडाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या अभुतपूर्व कामगिरीबद्दल नगराध्यक्ष फिरोज दोसानी,मुख्याधिकारी विवेक कांदे,तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.राजकुमार राठोड,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्यावर माहूरवासीयांसह जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

    पृथ्वी,वायु,जल,अग्नी आणि आकाश निसर्गाशी संबंधित या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यभरातील २३ हजार ६३२ नगरपंचायती,ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्ष ०२ऑक्टोंबर २०२० मध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती.’माझी वसुंधरा अभियान ४.०’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१मे २०२४ या कालावधीमध्ये राबविण्यात आले.माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२ हजार २१८ ग्रामपंचायती अशा एकूण २२ हजार ६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता.

   महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग यांच्या सर्वेक्षणानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातून अंतिम सर्वेक्षणात पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियानात माहूर नगरपंचायतीने दुसरा क्रमांक पटकविल्याचे पत्र नुकतेच माहूर नगरपंचायतला प्राप्त झाल्याने गेल्या चार वर्षात केलेल्या अपार मेहनतीचे चीज झाल्याची तसेच महाराष्ट्र शासनाने सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या माहूरगडची दुसऱ्या क्रमांकावर निवड केल्याने माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी शासनाचे आभार मानले आहेत. 

    गेल्या चार वर्षात पृथ्वी,वायू, जल,अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियानात कठीण परिस्थितीत अथक परिश्रम करून दुसरा क्रमांक पटविल्याबद्दल नागरिकातून तत्कालीन व वर्तमान नगराध्यक्ष फिरोज दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे, तत्कालीन मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार डॉ, राजकुमार राठोड, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी,स्वच्छता दूत गणेश जाधव, प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे,अभियंता विशाल ढोरे,कार्यालय प्रमुख संदीप गजलवाड,सिटी कॉर्डिनेटर मजहर शेख,सेवक सुरेंद्र पांडे यांचेसह नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मिळालेल्या या यशाबद्दल चौफेर अभिनंदन होत आहे. 

   विकासप्रिय तडफदार मुख्याधिकारी

नव्याने माहूर नगरपंचायतला रुजू झालेले तरुण,तडफदार मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी रुजू झाल्यापासूनच माहूर शहराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप द्यावे या उद्देशाने काहीतरी नवीन कार्य करून नाव लौकिक मिळविण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम माहूर शहरात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरुवात केली.माहूर शहरातील रस्ते नाल्यांचा कायापालट करून उच्चस्तरीय विकास कामे तसेच ग्रीन सिटी नगरपंचायतसाठी नवीन इमारत, भाविकांच्या वाहनासाठी अद्यावत पार्किंग, प्रदूषण कमी करण्यासाठी सौरऊर्जेवरील विद्युत व्यवस्था, पर्यटन स्थळांचा विकास, क्रीडांगण, महिला सशक्तीकरणांतर्गत असलेल्या शासनाच्या सर्व योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी, अतिक्रमणमुक्त शहरासाठी माहूर शहराची भूमि अभिलेख कार्यालयाद्वारे मोजणी या उलेखनीय कार्यासह इतर सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात सुरुवात केल्याने त्यांचे शहरवासीयातून मुक्तकंठाने कौतुक होत आहे.*

Share This Article
error: Content is protected !!