नायगाव / प्रतिनिधी अशोक वाघमारे
नायगाव – येथील मुलांची शाळा दिनांक 18 नोव्हेंबर रोजी भरली असून खानावळ चालक अजूनही वस्तीगृहात आला नसल्याने बाहेरगावची गोरगरिबांची शिकणारी मुले हे आपली शाळा भरली म्हणून आले असता खानावळ चालक अजूनही आला नाही असे सांगून मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना घरी पाठवले, याबाबत संबंधित अधिकारी यांना फोन केले असता कोणीही फोन उचलत नाही तेव्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न पालका पुढे निर्माण झाला आहे.
शाळा भरून आठ दिवस उलटून गेले तरीही नायगाव येथील मागासवर्गीय नवबौद्ध निवासी वस्तीग्रहाचा खानावळ चालक अजून तरी वस्तीगृहात आलेला नाही मुख्याध्यापक आणि खानावळ चालक यांच्यात नेमके काय गुपित लपले आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान जाणून-बुजून ते करीत आहेत आणि आपली शाळा भरली म्हणून बाहेर गावातील मुले यात करण जाधव बिलोली इयत्ता आठवी, सुशील एडके कोलंबी इयत्ता सातवी, परमेश्वर अलमुलवाड मुखेड इयत्ता सातवी, आणि श्रीकांत कोकुलवार हदगाव इयत्ता सातवी हे विद्यार्थी आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सदर वस्तीगृहात आले असता अजूनही खानावळ चालक आला नाही, आपणास भोजनाची व्यवस्था नाही म्हणून त्यांना परत मुख्याध्यापक एन व्ही हत्ते यांनी पाठवले याबाबत कार्यालयीन अधीक्षक एस.डी .सुरेवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देखील आपण देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलो असे सांगून मोकळे झाले तर संबंधित मुख्याध्यापक एन व्ही हत्ते यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन कट केला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना खानावळ चालक मुख्याध्यापक आणि कार्यालयीन अधीक्षक यांच्या कार्यप्रणाली बाबत वरिष्ठांना कळवावे या उद्देशाने समाज कल्याण अधिकारी राजेश मंगनाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील फोन रिसीव केला नाही.