हिमायतनगर ता.प्रतिनीधी/बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर – आज शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता असून नागरिकांना मध्ये भीतीच वातावरणात पसरलं आहे.
आज सायंकाळी 07 ते 09 दरम्यान दोन वेळेस विजेचा प्रचंड कडकडाट यामुळे हिमायतनगर शहरात भयावह वातावरण निर्माण झाले होते, हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे टाळकी ज्वारीचे काढून ठेवलेले पीक पावसामुळे भिजले आहेत.
हिमायतनगर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाकडे पुरेशी कर्मचारी संख्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून लाईट गेल्यावर तर हिमायतनगर वासिय मरण यातना भोगत आहेत.