नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये संत रामपाल जी महाराज यांच्या शिष्यांनी एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पुस्तक सेवा राबवली. या उपक्रमांतर्गत ‘ज्ञान गंगा’ आणि ‘जीने की राह’ ही संत रामपाल जी महाराज लिखित शास्त्राधारित पुस्तके समाजात धमार्थ मुल्य 20 रुपये घेवून वाटप करण्यात आली. या सेवेचा उद्देश केवळ पुस्तके वाटप करणे नव्हता, तर समाजाला शास्त्राधारे अध्यात्मिक जागृती देणे आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणे हा होता. आध्यात्मिक जागृतीचा प्रसार या पुस्तकांमध्ये पवित्र भगवद्गीता, वेद, कुराण, बायबल आणि गुरु ग्रंथ साहेब यांसारख्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करून शास्त्रसिद्ध सत्ये मांडली आहेत. सृष्टीचा रचयिता कोण आहे? सृष्टीच्या निर्मितीमागील रहस्य काय आहे? आणि मनुष्याचा जन्म कशासाठी झाला आहे? यांसारख्या गहन प्रश्नांची शास्त्राधारे उत्तरे या पुस्तकांतून स्पष्ट केली आहेत. या पुस्तकांत जीवन कसे जगावे आणि मृत्यूनंतर काय होईल यासंबंधी सखोल मार्गदर्शन दिले आहे. त्यामुळे अनेकांना जीवनाचे खरे उद्दिष्ट समजून घेण्यास मदत झाली. समाज सुधारणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन या उपक्रमाद्वारे भक्ती अंधश्रद्धा आणि
न करता शास्त्राधारे कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. मोक्षप्राप्तीसाठी योग्य आणि शास्त्रसिद्ध मार्ग कोणता आहे, हे स्पष्ट करण्यात आले. अंधश्रद्धा आणि अशास्त्रीय प्रथा टाळण्यास लोकांना प्रेरित करण्यात आले. सर्वधर्मसमभावाचा संदेश ‘ज्ञान गंगा’ आणि ‘जीने की राह’ ही पुस्तके कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नाहीत. विविध धर्मग्रंथांतील ज्ञानाचा समन्वय साधत या पुस्तकांमध्ये मानवजातीच्या कल्याणासाठी विचारप्रवर्तन केले आहे. त्यामुळे सर्व धर्मातील लोकांसाठी ही पुस्तके उपयुक्त ठरली. संत रामपाल जी महाराज यांचे समाजहितकारी कार्य या उपक्रमाद्वारे संत रामपाल जी महाराज यांच्या इतर समाजहितोपयोगी कार्यांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली. यामध्ये खालील कार्यांचा समावेश होताः हुंडा प्रथा निर्मूलनः हुंडा घेणे आणि देणे हे पूर्णतः बंद करण्याचा संदेश. भ्रष्टाचार आणि व्यसनमुक्त निर्मूलनः नैतिकता प्रामाणिकपणाचा समाजः तंबाखूसेवन आणि इतर कडेकोट शिष्यांचे बंदीचा प्रचार. मद्यपान, व्यसनांवर आग्रह. निस्वार्थ योगदान संत रामपाल जी महाराज यांच्या शिष्यांनी तन, मन आणि धन यासह या सेवेत निस्वार्थपणे सहभाग घेतला. समाजात महत्त्वाचे ज्ञान आणि सत्य पोहोचवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट
दंतकथांवर आधारित होते. त्यांनी लोकांना जीवनाचे खरे उद्दिष्ट समजावून सांगितले आणि शास्त्राधारे भक्तीचे महत्त्व पटवून दिले. पुस्तक सेवेचा उद्देश या पुस्तक सेवेचा उद्देश केवळ पुस्तकांचे वितरण करणे नव्हते, तर समाजाला शास्त्राधारे प्रबोधन देऊन अध्यात्मिक जागृती घडवून आणणे हा होता. या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो लोकांना संत रामपाल जी महाराज यांच्या शिकवणींचा लाभ मिळाला. या सेवेचा परिणाम म्हणूनः समाजातील अंधश्रद्धा, हुंडा प्रथा आणि व्यसनाधीनतेविरुद्ध जनजागृती झाली. शास्त्राधारे भक्ती आणि अध्यात्मिक एकतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला. हजारो लोकांनी जीवनाचे खरे उद्दिष्ट समजून घेतले आणि शास्त्रसिद्ध मार्गावर चालण्याचा निर्धार केला. भविष्यातील दिशा या ऐतिहासिक पुस्तक सेवेच्या यशामुळे शिष्यांनी भविष्यातही असे समाजहितकारी उपक्रम नियमितपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संत रामपाल जी महाराज यांच्या शिकवणींमुळे समाजाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे समाजात शांती, समता आणि अध्यात्मिक एकतेचा मार्ग प्रशस्त होण्यास मदत होईल. या ऐतिहासिक पुस्तक सेवेच्या माध्यमातून संत रामपाल जी महाराज यांच्या शिष्यांनी समाजात अध्यात्मिक जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक सुधारणा यांचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो लोकांना जीवनाचे खरे उद्दिष्ट समजले आणि शास्त्राधारे भक्ती करण्याचा मार्ग सापडला.