हंडाभर पाण्यासाठी लोकांची वणवण,मग लाखो रुपये गेले कुठं?
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारित येणारे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प,विष्णुपुरी प्रकल्प,पूर्णा पाटबंधारे विभाग आणि लेंडी प्रकल्प यांच्यावरील देखभाल व दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
हंडाभर पाण्यासाठी लोकांची वणवण मग लाखो रुपये गेले कुठं?
नांदेड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पाण्याची वाणवा जल व्यवस्थापन पंधरवडा उरला फक्त नावालाच
हंडाभर पाण्यासाठी लोकांची भटकंती सध्या नांदेड येथे नांदेड पाटबंधारे मंडळाच्या वतीने “जल व्यवस्थापन पंधरवडा” साजरा केला जात आहे.
मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी देखील वणवण फिरावी लागत आहे.दुसरीकडे,तलावातील अवैध गाळ उपसा मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील गावागावात हा उपक्रम पोहोचवण्याचा विसर पाटबंधारे विभागाला पडल्याचे स्पष्ट होत आहे.नांदेड पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारित येणारे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प,विष्णुपुरी प्रकल्प,पूर्णा पाटबंधारे विभाग आणि लेंडी प्रकल्प यांच्यावरील देखभाल व दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
लघु सिंचन प्रकल्प पाटबंधारे मंडळाने कोल्हापुरी बंधारे,पाझर तलाव,सिमेंट बंधाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्याचा आराखडा तयार करण्याची व दुरुस्ती-नवनिर्मिती करण्याची जबाबदारी घेतली आहे.पण प्रत्यक्षात अनेक बंधारे कोसळले आहेत,अनेक ठिकाणी पाणी साचत नाही, तर काही बंधारे फक्त कागदोपत्री अस्तित्वात आहेत.
ऐकूनच येईल घेरी गेल्या पाच वर्षांत पाटबंधारे विभागात कोणत्याही नव्या सिंचन प्रकल्पाला तांत्रिक मान्यता दिली गेली नाही. मुखेड,भोकर,हिमायतनगर आणि किनवटसारख्या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये चांगले पर्जन्यमान असूनही जंगलातून वाहणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोतांवर कोणतेही नवीन प्रकल्प सुरू करण्यात आलेले नाहीत.यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊन लोकांना भटकावे लागत आहे.
जलसंधारण व भूजल पुनर्भरण जिल्ह्यात कोणत्या गावात, कोणत्या वर्षी,कोणत्या तारखेला जलसंधारण किंवा भूजल पुनर्भरणाचे उपक्रम राबवले गेले,याची माहिती फोटोसहित नांदेड पाटबंधारे मंडळाकडे उपलब्ध नाही.
शेतकऱ्यांना पाणी वापरासंदर्भात मार्गदर्शन,पाणी वापराचे नियोजन,आणि पाणी वापर संस्था स्थापन करण्याबाबत देखील विभागाकडे पाच वर्षांतील कोणतीही आकडेवारी नाही.या वसुंधरा दिनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी पूरक ठरणाऱ्या 5 उत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटर नवीन सिंचन प्रकल्पांसाठी किती प्रस्ताव तयार करण्यात आले,किती निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्या,व किती वर्क ऑर्डर्स जारी करण्यात आल्या याचा लेखाजोखा देखील उपलब्ध नाही.
जल व्यवस्थापन पंधरवडा प्रत्यक्षात नाही,फक्त कागदावर
राज्य सरकारच्या निर्देशानुसार राबवला जाणारा “जल व्यवस्थापन पंधरवडा”प्रत्यक्ष गावात न राबवता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील वातानुकूलित खोलीत साजरा होत आहे.त्यामुळे हा उपक्रम फक्त कागदावरच राबवला जात असून शासनाच्या लाखो रुपयांचा अपव्यय होतो आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना, पाटबंधारे विभागाचा “जल व्यवस्थापन पंधरवडा” केवळ नावापुरता उरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.