भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत “दोन्ही देशांमध्ये थेट” चर्चा…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

भारत आणि पाकिस्तानने जमीन, हवा आणि समुद्रातून ‘सर्व गोळीबार, लष्करी कारवाई थांबवण्याचा’ घेतला निर्णय 

नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान युद्धबंदी करार: परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “पाकिस्तानच्या डीजीएमओने दुपारी ३.३५ वाजता डीजीएमओला फोन केला. दोन्ही बाजूंनी संध्याकाळी ५ वाजल्यापासून हवाई आणि समुद्रातून सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचे मान्य केले.”

“पाकिस्तानच्या डीजीएमओ (सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक) यांनी दुपारी ३.३५ वाजता (भारताच्या डीजीएमओ) यांना फोन केला. दोन्ही बाजूंनी संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमीन, हवा आणि समुद्रातून सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवावी यावर त्यांनी सहमती दर्शवली,” असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी पुन्हा चर्चा करतील.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही एक्स वर पोस्ट केले की, “भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार थांबवण्याबाबत आणि लष्करी कारवाईबाबत एक सामंजस्य करार केला आहे.”

Share This Article
error: Content is protected !!