संविधान म्हणजेच भारताची लोकशाही आहे.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – नियोजन भवन नांदेड येथे संविधानाच्या अमृत महोत्सवकार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय संविधान आणिमाझी भूमिका या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी गांधीवादी विचारसरणीचे उत्कृष्ट लेखक मा.खासदार तुषारजी गांधी साहेब यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणाऱ्या कार्यक्रमास खासदार रविंद्र चव्हाण यांनी संविधान म्हणजेच लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करणे ही माझी प्रथम जबाबदारी आहे असे प्रतिपादन करून उपस्थितांना संबोधित केले.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार व्यंकटेश काब्दे साहेब,माजी सनदी अधिकारी एकनाथराव मोरे साहेब, lउपमहापौर आनंदराव चव्हाण साहेब, रेखाताई चव्हाण, सुरेंद्र घोडसकर,उज्वला पडळकर,बालाजी चव्हाण, यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.