हदगाव ता.प्रतिनिधी/
हादगाव – हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील पैनगंगा व कयाधू नदी पात्राच्या काठावरील ६ गावांना नेहमीच पुराच्या पाण्याचा फटका बसतो. पुराच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून गावांचे सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करण्यात आले खरे परंतु ही गावे विकासापासून वंचित आहेत. या पुनर्वसित गावांचा सर्वांगिण विकासाकरिता राज्य शासनाकडून ११ कोटी ६० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या गावांचा सर्वांगिण विकास केला जाईल अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.