अतिवृष्‍टी अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

विशेष प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड 

हिमायतनगर  – जिल्ह्यात जुन-जुलै 2023 मध्ये अतिवृष्‍टी व पुरामुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्‍या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रीक पद्धतीने ई-केवायसी करुन घ्‍यावे. ई-केवायसी करण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्याच्‍या आधार संलग्‍न बॅंक खात्‍यावर शासनाकडून रक्‍कम जमा करण्‍यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात जुन-जुलै 2023 मध्ये अतिवृष्‍टी व पुरामुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने जिल्‍ह्यातील 6 लाख बाधित शेतकऱ्यांसाठी 420 कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. सद्यस्थितीत 3 लाख 50 हजार बाधित शेतकऱ्यांसाठी 250 कोटी रुपयाच्या रक्कमेच्या याद्या शासनाच्‍या ऑनलाईन पोर्टलवर तहसील कार्यालयामार्फत संबंधीत तलाठी यांनी अपलोड केल्‍या आहेत. ही माहिती अपलोड केलेल्‍या बाधित शेतकऱ्यांना वि. के. नंबर प्राप्‍त झाले असून हे नंबर संबंधीत गावाचे तलाठी यांच्याकडे उपलब्‍ध आहेत. बाधित शेतकऱ्यांनी तलाठी यांच्याकडून वि. के. नंबर प्राप्‍त करुन घ्‍यावेत.

ई-केवायसी होत नसल्‍याची बाब अनेक शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्‍याअनुषंगाने शासन स्‍तरावर संपर्क केला असता, केंद्र शासनाच्‍या युआयडीएआय आधार पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्‍याने बायोमॅट्रीक पडताळणी आणि ओटीपी तयार होत नसल्‍याबाबत माहिती मिळाली आहे. ही समस्‍या लवकरच सोडवली जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share This Article
error: Content is protected !!