हदगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँके चा पीक कर्ज नूतनीकरण मेळावा संपन्न…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हदगाव प्रतिनिधी /गजानन जिदेवार 

हदगाव : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तामसा अंतर्गत आष्टी येथे पीक कर्ज नूतनीकरण मेळावा रविवार दि. ०९ जुलै २०२३ रोजी संपन्न झाला. या वेळी क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. निखिल नाफडे यांनी आष्टी गावातील शेतकरी व ग्रामस्थांना संबोधित केले व पीक कर्ज नूतनीकरण करण्याचे फायदे व न करण्याचे नुकसान समजाऊन सांगितले .सर्व थकित पीक कर्ज धारकांनी आपले कर्ज नियमित करून मुख्य प्रवाहात यावे व शासनाकडून वेळोवेळी मिळणारे प्रोस्थाहन पर अनुदान याचा लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी श्री नाफडे यांनी केले. आष्टी येथील सर्व शेतकरी बांधवांनी सुधा याला भरभरून प्रतिसाद देत आपले पीक कर्ज नूतनीकरण करून घेऊ अशे आश्वासन दिले.क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी श्री. प्रकाश कांबळे यांनी सुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांना पीक कर्ज नूतनीकरना बद्दल मार्ग दर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचानल पवार सर यांनी केले या वेळी अनिल रावते, चारुशीला भोवते , दोडके सर व समस्त असंख्य शेतकरी गावकरी उपस्थित होते ..

Share This Article
error: Content is protected !!