हिमायतनगर ता.प्रतिनिधी/ जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर तालुक्यात गूरूवारच्या रात्री तालुक्यात ढगफुटी पाऊस पडून शेतीचे 70%नुकसान झाल्याचा अंदाज दर्शीवला जात आहे.
या वर्षी पेरण्या उशीरा झाल्या आहेत.बहुताशं शेतकऱ्यांनी या वर्षी महामंडळाचे बियाणे खरेदी केले होते परंतु महामंडळाचे 612,753,726 बियाणे उगवले नाही.त्यात कसी बसी कर्ज काढून पेरणी केली.परंतू ते बियाणे उगवले जात आसतांना अचानक पणे गूरूवारच्या रात्री ढग फुटी पाऊस पडून पिके व जमीन खरडून जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.काही जमीनीच्या क्षेत्रात तर 100%च पिके जाऊन जमीन खरडून गेल्या आहेत.

कृषी व महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकरी वर्गात मागनी जोर धरू लागली आहे.