मुंबई-पुणे एक्सप्रेसवर काल सात ते आठ गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. खालापूर टोल नाका आणि लोणावळा घाटाच्या मधील भागात हा अपघात झाला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर काल सात ते आठ गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. खालापूर टोल नाका आणि लोणावळा घाटाच्या मधील भागात हा अपघात झाला आहे. या अपघातात बस बरोबरच कारचा देखील समावेश आहे. या अपघातात कार मधील प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणातीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.